Monday, January 3, 2022

क्रांतिज्योती सावित्रीईबाई फुले जयंती

 *विनम्र अभिवादन..* 

*देशातील आद्य स्त्री शिक्षिका..*

*देशातील आद्य* *मुख्याध्यापिका..*

*प्रतिभावंत कवयित्री..*

*समस्त स्त्री वर्गाला गुलामीच्या बंधनातून मुक्त करणाऱ्या मुक्तिदात्या..*

*थोर समाज सुधारक..*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..*🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏


*3 जानेवारी 18 31 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या छोट्याशा खेड्यात खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी एक स्त्री रत्न जन्मास आले.*


*सिद्धूजी ,सखाराम ,श्रीपती अशा तीन भावंडांची एकुलती एक बहीण म्हणजे क्रांतीज्योती सावित्री..*


*मुलगी झाली म्हणून गावभर साखर वाटप करणारे खंडोजी नेवसे पाटील हे एक आदर्श वडील क्रांतीज्योती सावित्री यांना लाभले हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल..*


*याकाळात समाजामध्ये अनेक वाईट चालीरीती रूढी परंपरा समाजात सर्व मान्य होत्या. त्यापैकी बालविवाह, सतीची चाल केशवपन अशा अनेक रूढी परंपरांनी स्त्रियांना तुच्छतेची वागणूक दिली होती.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी गोविंदराव फुले यांचे सुपुत्र ज्योतिराव फुले यांच्याशी सन 18 40 मध्ये झाला.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई ह्या सुरुवातीस निरक्षर होत्या परंतु ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहा-वाचायला लावले त्यांना साक्षर बनविले एवढेच नव्हे तर त्यांना ट्रेनिंग देऊन देशातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका बनविले.*


*सावित्रीबाई फुले यांच्यासोबतच ज्योती रावांची मावस बहीण सगुणाबाई ह्या सुद्धा शिक्षित झाल्या.*


*ज्योतिरावांनी शिक्षणाचे महत्त्व पूर्णपणे ओळखले होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे.*

*विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.*

*अशा मार्मिक शब्दांमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी विद्येचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.*


*1 जानेवारी 18 48 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दररोज मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेत पायी पायी चालत जात.*

*वाटेने जात असताना काही कर्मठ सनातनी वृत्तीचे माणसे सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखल, माती, शेण, दगड,धोंडे फेकत.*

*परंतु सावित्रीबाई फुले काही डगमगल्या नाहीत त्यांनी मुलींना शिकविण्याचे व्रत अखंडपणे चालूच ठेवले.*


*सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत जोतीरावांच्या मित्रमंडळी पैकी असणाऱ्या सहा मुलींनी प्रवेश घेतला.*

*१. अन्नपूर्णा जोशी वय पाच वर्ष*

*२. सुमती मोकाशी वय चार वर्ष*

*३. दुर्गा देशमुख वय सहा वर्ष*

*४. माधवी थत्ते वय सहा वर्ष*

*५. सोनू पवार वय चार वर्ष*

*६. जनी कर्डीले वय पाच वर्ष*

*अशा फक्त सहा मुली सुरुवातीला शाळेत दाखल झाल्या होत्या.*

*या सहा मुलींपैकी चार मुली ब्राह्मण समाजातील होत्या. एक मुलगी मराठा समाजातील तर एक मुलगी धनगर समाजातील होती.*


*पेशव्यांची राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये आता सर्वत्र धर्म बुडणार..! संस्कृती लयाला जाणार..! घोर कलियुग आले आहे..! अशा नाना तर्‍हेने सनातन्यांनी मुलींच्या शाळेला विरोध करायला सुरुवात केली.*


*काही धर्ममार्तंडांनी आणि कर्मठ सनातन्यांनी गोविंदराव फुले यांचे कान भरले आणि ज्योतिरावांनी व सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणापासून प्रवृत्त व्हावे अन्यथा समाज फुले कुटुंबियांना धर्म बहिष्कृत करेन अशी धमकी गोविंद रावांना दिल्यामुळे गोविंदरावांनी ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना निर्वाणीचे सांगितले की तुम्ही मुलींना शिकविण्याचे काम सोडून द्या.*


*महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत मी मी अंगीकारलेले व्रत सोडणार नाही. असे म्हणून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे वडिलांचे घर सोडून दुसरीकडे गेले.*


*महात्मा ज्योतीराव फुले यांचे बाल सवंगडी उस्मान शेख यांनी जोतिराव आणि सावित्रीबाईंना आपल्या घरी नेले. त्यांच्या संसारासाठी भांडीकुंडी दिली.*


*जगाच्या दुःखाचे कारण आणि दुःखाचा विनाश करण्यासाठी राज पदाचा त्याग करणारा राजपुत्र सिद्धार्थ गौतम आणि समस्त स्त्री वर्गाच्या उद्धारासाठी घरादाराचा त्याग करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले हे महान रत्न याच मातीत जन्माला आली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.*


*अल्पावधीतच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नातून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात वीस ते पंचवीस शाळा सुरू झाल्या.*


*पाहता पाहता पुण्यातील शिक्षणाची चर्चा इंग्लंड पर्यंत पोहोचली.*

*इंग्लंडच्या महाराणीचा आदेशाला शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा यथोचित सत्कार करण्यात यावा.*

*राणी साहेबांच्या आदेशावरून पुण्याचे कलेक्टर मेजर कॅन्डी यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग वाड्यात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा गौरव करण्यात आला.*

*16 नोव्हेंबर 18 52 या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा उचित गौरव व्हावा म्हणून तत्कालीन सरकारने त्यांचा जंगी सत्कार आयोजीत केला.*

*या सत्काराला पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.*


*या सत्कार प्रसंगी 193 रुपयांच्या दोन शाली महावस्त्र म्हणून सरकारच्या वतीने ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना प्रदान करण्यात आल्या.*

*जोतिरावांच्या संस्थेच्या शाळा ची दुसरी वार्षिक परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 18 53 रोजी घेण्यात आली.*

*सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या या परीक्षेसाठी 237 विद्यार्थ्यांनी परीक्षा देत होत्या ही परीक्षा पाहण्यासाठी पुनाकॉलेजच्या विद्यार्थ्यांसह प्रतिष्ठित मंडळी आणि बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.*

*याप्रसंगी विद्यार्थिनींना कार्यक्रमाच्या अध्यक्ष विशेष जोन्स यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले*


*याप्रसंगी बक्षीस स्वीकारताना एका चिमूरड्या मुलीने साड्या पुस्तकाचे बक्षीस न देता आम्हाला शाळेसाठी ग्रंथालय द्या अशी स्पष्ट सूचना केली आणि ही सूचना ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी अमलात आणली.*

*शालेय ग्रंथालयाच्या योजनेची ही सूचना माइल स्टोन ठरली आहे.*


*महिला सेवा मंडळ नावाची एक संस्था याच सुमारास सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केली.*

*या मंडळाच्या सचिव सावित्रीबाई फुले होत्या तर अध्यक्षा पुण्याचे कलेक्टर जोन्स यांच्या पत्नी मिसेस जोन्स ह्या होत्या.*


*सन 18 63 साली ज्योतिरावांनी आपल्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.*

*या बालहत्या प्रतिबंधक गृह आत शंभराहून अधिक महिलांची बाळंतपण सावित्रीबाईंनी मोठ्या आनंदाने केली.*

*याच बालसुधारगृहातील काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतला आणि त्याला शिकून डॉक्टर केले.*


*सन 18 68 मध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी आपल्या अंगणातील पाण्याची विहीर अस्पृश्य बंधू-भगिनींना साठी खुली केली.*


*दिनांक 24 सप्टेंबर 18 73 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.*


*जुलै 18 87 च्या सुमारास महात्मा ज्योतिराव फुले पक्षाघाताने आजारी पडले.*


*सावित्रीबाई फुले यांच्यावर काळाने आघात केला आणि 28 नोव्हेंबर 18 90 रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे निर्वाण झाले.*

*सावित्रीबाई मोठ्या धीरोदात्तपणे आल्या प्रसंगाला सामोरे गेल्या.*

*सत्यशोधक समाजाचे आणि उर्वरित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याची धुरा सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर वाहिली.*


*सन अठराशे 96 मध्ये पुण्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला.*

*दुष्काळा पाठोपाठ सण 18 97 यावर्षी पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले.*

*साथीच्या रोगाने माणसे पटापट मरु लागली.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत याला नगर वरून पुण्याला बोलावून घेतले आणि साथीच्या हजाराच्या काळात ससाणे यांच्या माळावर प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखाना सुरू करायला लावला.*


*हॉंगकॉंग बंदरातून मुंबई बंदर व्हाया पुणे असा सण 18 97 च्या आरंभाला आगमन झालेला प्लेग पुण्यामध्ये थैमान घालू लागला.*

*प्लेग हा संसर्गजन्य आजार आहे हे माहीत असतानाही त्या माऊलीच्या ममतेने रोग्यांसाठी कार्य करत राहिल्या.*


*सावित्रीबाई फुले ह्या स्वतः प्लेगचा रुग्णाची सेवा करू लागल्या.*


*मुंढवा गावातील अस्पृश्य बालरुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड यास लेकच्या दवाखान्यात नेत असताना सावित्रीबाई फुले यांना प्लेग या महाभयंकर साथीच्या रोगाची लागण झाली.*

*दिनांक 10 मार्च 18 97 रोजी सावित्रीबाई फुले यांचे प्लेगच्या आजाराने निधन झाले.*


*सतत पन्नास वर्ष लोकसेवेचे व्रत करणारी ही ममताळू माउली आता काळाच्या उदरात विसावली . ज्योतीरावांची ज्योत आनंतांची माता आता अनंतात विलीन झाली.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*


*वाचे उच्चारी तैसा क्रिया करी*

*तीच नरनारी पूजनीय*

*सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ*

*होई कृतार्थ तेच वंद्य*

*सुख-दुःख काही स्वार्थ पणा नाही*

*परहित पाही तोच थोर*

*मानवाचे नाते ओळखती जे ते*

*सावित्री वंदते तेच संत..*


*जय ज्योती जय सावित्री जय क्रांती..*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍️👆

No comments:

Post a Comment